समुद्राचे चाळीस मीटरपर्यंत अतिक्रमण

समुद्राचे चाळीस मीटरपर्यंत अतिक्रमण

रत्नागिरी -  अमावास्येनंतर सलग तीन दिवस आलेल्या उधाणाच्या भरतीमुळे काळबादेवी किनारा उद्‌ध्वस्त झाला आहे. किनाऱ्याची धूप झाली असून समुद्र पंचवीस ते चाळीस मीटर आतमध्ये घुसला आहे. येथील वस्तीला धोका निर्माण झाला आहे. बिर्जेवाडीजवळील काजूच्या बागेत पाणी घुसल्याने नवीन रोपांचे नुकसान झाले आहे.

मोठ्या भरतीमुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा दिला होता; मात्र मुसळधार पाऊस आणि समुद्राचे अतिक्रमणाचा तडाखा किनारी भागांना बसला. त्यात काळबादेवी किनाऱ्याचाही समावेश आहे. येथील पारकरवाडीपर्यंत सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून ८०० मीटर धूपप्रतिबंधक बंधारा बांधला होता. पुढील अडीचशे मीटरसाठी दोन कोटी मंजूर आहेत; परंतु ते अद्याप सुरू झालेले नाही. बंधारा पूर्ण न झाल्याने अतिक्रमणामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. काही वर्षांपूर्वी येथील स्मशानभूमी जमीनदोस्त झाली होती. नव्याने बांधलेली स्मशानभूमीही गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात वाहून गेली. काळबादेवीत पिण्याच्या पाण्याचे स्रोत मर्यादित आहेत. उधाणाच्या पाण्यामुळे समुद्राजवळील विहिरीही मचुळ झाल्या आहेत.

अमावस्येच्या उधाणामुळे किनाऱ्याची धूप झाली आहे. किनाऱ्यावरील सुरूची झाडेही उन्मळून पडली. किनाऱ्यावरील भागात अशोक बिर्जे यांनी काजूची लागवड केली आहे. त्यांच्या काजू बागेत पाणी घुसल्याने झाडांचे नुकसान झाले आहे. जुन्या बांधलेल्या बंधाऱ्याच्या दगडीही वाहून गेल्या आहेत.

काळबादेवी किनाऱ्यावरील लोकवस्तीच्या संरक्षणासाठी अजून पाचशे मीटर बंधाऱ्याची आवश्‍यकता आहे.
- महेंद्र बिर्जे-राजू पारकर, काळबादेव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com