राजापूरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचा ठराव संमत

राजापूरात ग्रीन रिफायनरी प्रकल्पाचा ठराव संमत

राजापूर (रत्नागिरी) : राजापूर (Rajapur) शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास, दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा, शैक्षणिक विकास अन् रोजगार निर्मितीसाठी प्रस्तावित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची (green refinery project) आवश्यकता असून प्रकल्प उभारणीचे समर्थन करणारा ठराव आज नगर पालिकेच्या सभेमध्ये संमत करण्यात आला. नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या पालिकेच्या बैठकीमध्ये अकरा विरूद्ध पाच मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजपचे एक तर, विरोधी गट असलेल्या शिवसेनेच्या दोन नगरसेवकांनी प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली.(green-refinery-project-resolution-approved-rajapur-kokan-marathi-news)

रिफायनरी प्रकल्प उभारणीबाबतच्या या ठरावाच्यावेळी विरोधी गट असलेल्या शिवसेनेने ठराव विरोधी भूमिका घेतली असली तरी, शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी प्रकल्प समर्थनाच्या बाजूने मतदान केले. तर, मनिषा मराठे यांनी फोन करून आपण प्रकल्पाच्या ठरावाचे समर्थन करत असल्याची माहिती दिल्याचे नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी सांगितले.  तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीचे समर्थन करणारा ठराव नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी आज ऑनलाईन झालेल्या नगर पालिकेच्या सभेमध्ये मांडला. त्याचे समर्थन करीत त्याला उपनगराध्यक्ष आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर यांनी अनुमोदन दिले.

त्यावर चर्चा होताना शिवसेनेचे विरोधी गटनेते विनय गुरव यांनी उपसूचना मांडताना शिवसेना पक्षाची जी भूमिका आहे तीच आपली भूमिका असल्याचे स्पष्ट करीत प्रकल्पाला समर्थन नसल्याची भूमिका मांडली. त्या उपसूचनेला शिवसेनेचे नगरसेवक सौरभ खडपे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर शिवसेनेच्या विनय गुरव, सौरभ खडपे, स्वाती बोटले, शुभांगी सोलगावकर, प्रियांका आडविलकर या पाच नगरसेवकांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. तर, प्रकल्पाचे अ‍ॅड. जमिर खलिफे, सुभाष बाकाळकर, सुलतान ठाकूर, आसिफ मुजावर, स्नेहा कुवेस्कर, मुमताज काझी, परवीन बारगीर (सर्व काँगे्रेस), संजय ओगले (राष्ट्रवादी), प्रतिक्षा खडपे (शिवसेना), गोविंद चव्हाण (भाजप) यांनी ऑनलाईन सभेमध्ये तर, सेनेच्या सौ. मराठे यांनी फोनद्वारे संपर्क साधून प्रकल्प समर्थन केल्याने हा ठराव अकरा विरूद्ध पाच मतांनी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष अ‍ॅड. खलिफे यांनी दिली.

“ राजापूर शहर आणि तालुक्याच्या सर्वागीण विकासासह भविष्यामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासह रोजगार निर्मिती होण्यासाठी ग्रीन रिफायनरीसारख्या प्रकल्पाची आवश्यकता आहे. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन या प्रकल्पाची उभारणी व्हावी. कोरोनाच्या महामारीमध्ये रत्नागिरी ग्रीन रिफायनरी कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सुविधा तालुकावासियांसाठी दिलासादायक आहेत. ”

अ‍ॅड. जमीर खलिफे, नगराध्यक्ष

“ रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असून ग्रामपंचायतींनीही ठराव दिले असून नगर परिषदेने ठराव द्यावयास काहीच हरकत नाही. आपण प्रारंभीपासूनच या प्रकल्पाच्या समर्थनाच्या बाजूने आहोत. ”

प्रतिक्षा खडपे, शिवसेना नगरसेविका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com