रत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

रत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष

देवरूख - आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील अंतर्गत संघर्ष उघड झाला आहे. दोन्ही जबाबदार पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वेगळ्या विधानांची जोरदार चर्चा सुरू आहे.

युती झाली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचे काम करण्याची भाजपची तयारी नाही. त्यामुळे या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करून येथून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळावी यासाठी शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांची भेट घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

त्यांचीच रि सिंधुदुर्गात राजन तेली यांनी ओढली.मानेंच्या वक्‍तव्याला २४ तास उलटत नाहीत, तोपर्यंत जिल्हा दौऱ्यावर आलेले रत्नागिरीचे संपर्क मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या मतदारसंघातून एनडीएचा उमेदवार निवडून आणणार, समविचारी पक्षांनाही बरोबर घेणार असे विधान केले. यामुळे हे विधान जिल्हाध्यक्षांच्या विधानातील हवा काढण्यासाठी होते की ही पक्षाची भूमिका होती याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

बाळ मानेंच्या गैरहजेरीने चर्चा
गेले काही महिने जिल्हाध्यक्षांविरोधात जिल्ह्यातच मोठी आघाडी उभारण्यात येत आहे. याला काही वरिष्ठांचे पाठबळ आहे. गेले काही महिने रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात बाळ माने दिसत नाहीत. शिवाय या मतदारसंघाचे पालक असलेल्या आमदार प्रसाद लाड यांच्या कार्यक्रमांपासूनही जिल्हाध्यक्ष दूर असतात. त्यामुळे त्यांना बाजूला ठेवण्यात येते की हे सर्व जाणूनबुजून सुरू आहे याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com