Ratnagiri Ghat : काजिर्डा घाटरस्त्याला अखेर गती; कोल्हापूर ३५ किमी अंतराने जवळ
Kajirda Ghat Road : रत्नागिरी जिल्ह्यातील काजिर्डा येथील घाटरस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद होताच सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला आहे.
राजापूर : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील कोल्हापूर जिल्हा अशा तीन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील काजिर्डा घाटरस्ता गेले कित्येक वर्ष दुर्लक्षित आहे.