Ratnagiri Child Marriage Issue : कातकरी समाज अमृत काळातही मागासलेला; बालविवाहाचे मूळ यातच, लोकसंख्येचा डाटा बनवणे आवश्यक
Katkari Community : ‘अमृत काळा’त विकासाच्या गप्पा रंगत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील कातकरी समाज आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. शिक्षण, रोजगार आणि ओळखपत्रांचा अभाव यामुळे या समाजातील बालविवाहासारख्या समस्या वाढताना दिसत आहेत.
जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाजातील बालविवाह रोखणे हे वेगळे काम म्हणून करता येणार नाही. त्याचा संबंध आदिवासी जीवनाशी त्यांच्या होणाऱ्या परवडीशी निगडित आहे. त्यांच्या जगण्याचा स्तर उंचावण्यातील तो एक भाग आहे.