

Katkari families migrating for seasonal work
sakal
रत्नागिरी : वर्षाचे बारा महिने कातकरी समाज जंगलात आपल्या वस्तीत राहू शकत नाही. मजूर म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलावले जाते. जमिनीची बांधबंदिस्ती, मंदिराची साफसफाई, कौल तोडणे, भातलावणी, भात कापणे आणि प्रामुख्याने बागा राखणे अशा कामांसाठी हा समाज जात त्यामुळे जंगलतोडीसह काही कामांसाठी त्याला आपल्या मूळ वस्तीपासून स्थलांतर करावे लागते.