आमची मुले शाळेत जात नाहीत का? - मालवण सभापतींना सवाल

आमची मुले शाळेत जात नाहीत का? - मालवण सभापतींना सवाल

मालवण - "आमची मुले शाळेत जात नाही का? आम्ही मालवण तालुक्‍यात राहत नाही का? जर मालवण तालुक्‍यात राहतो तर मग आमच्या मार्गावरील एसटी बस बंद करण्याचा अधिकार सभापतींना दिलाच कोणी? असा सवाल करत कातवड येथील महिला आक्रमक बनल्या. जर आमच्या मार्गावरील एसटी बंद केल्यास सभापती सोनाली कोदे यांच्या दालनात जाऊन जाब विचारू, असा इशारा संतप्त महिलांनी दिला. 

कोळंब पुलावरून एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर मालवण कुडोपी एसटी बसफेरी कोळंब पुलावरून सोडण्यात आली. याबाबत खैदा- कातवड ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी सायंकाळची मालवण कुडोपी एसटी बसफेरी खैदा- कातवड गावातून सोडावी, अशी मागणी आगारव्यवस्थापक नरेंद्र बोधे यांच्याकडे केली होती; मात्र खैदा- कातवड मार्गावरून सोडली जाणारी बसफेरी बंद करून ती कोळंब पुलावरून सोडली जावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती कोदे यांनी आगार व्यवस्थापकांकडे केली. यावरून आक्रमक बनलेल्या कातवड येथील उन्नती ग्रामसंघ, कोळंबच्या महिला ग्रामस्थांनी आज आगारात धडक देत बोधे यांना जाब विचारला. 

यावेळी कोळंब उन्नती ग्रामसंघाच्या महिलांसोबत कोळंब सरपंच प्रतिमा भोजने, अध्यक्ष सिया धुरी, सचिव संपदा प्रभू, अर्चना धुरी, सानिका चव्हाण, कांचन धुरी, मंगल मानेकर, दीपिका कदम, प्रीती कदम, शुभांगी मालप, प्रेमा म्हापसेकर, रजनी धुरी, शांती शर्मा, रविना परब, दीपाली लोके, निकिता बागवे, अनिशा धुरी, साधना चव्हाण, शोभा लोके, स्मिता केळुसकर, रतन चौगुले आदी महिला उपस्थित होत्या. 

मालवण ते कातवड ओझर मार्गावर एकच बसफेरी सुरू आहे; मात्र कातवड गावातून सुमारे 25 ते 30 शालेय विद्यार्थी, बहुतांश महिला, ज्येष्ठ नागरिक बाजारात भाजीपाला विक्रीसाठी जातात. त्यांना मालवण ते कातवड असा प्रवास करावा लागतो. यासाठी सकाळी एकमेव बसफेरी सोडली जाते. इतर वेळी प्रवाशांना खैदा- ओझर येथे उतरून सुमारे 3 ते 4 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ग्रामस्थांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सकाळी, दुपारी व सायंकाळी मालवण खैदा- कातवड ओझर मालवण, अशी नवीन बसफेरी सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

जोपर्यंत नवीन बसफेरी सोडली जात नाही तोपर्यंत मालवण कुडोपी एसटी बस खैदा- कातवड गावातून सोडण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी आगारव्यवस्थापक बोधे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून नियोजन करण्याचे स्पष्ट केले. 

आमदारांनी घेतली दखल 
तालुका दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांची भेट घेऊन समस्या मांडली. यावेळी नाईक म्हणाले, ""जर सभापतींच्या मागणीवरून एसटी वाहतूक बंद केली तर खैदा-कातवड गावातून नवीन बसफेरी सुरू करू. कातवड रस्त्याचे काम दिवाळीच्या काळात पूर्ण केले जाईल. त्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येतील. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी विंधन विहिरी दिल्या जातील त्यासाठी आवश्‍यक जागा उपलब्ध करून द्यावी.'' यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गणेश कुडाळकर, बाबी जोगी आदी उपस्थित होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com