Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Outrage Over Incomplete Mumbai-Goa Highway Work: अपूर्ण, निकृष्ट महामार्गावर खड्डे, अर्धवट पूल आणि तासन्तास कोंडी; तरीही खारपाडा टोल नाक्यावर हायटेक वसुली सुरू झाल्याने रायगडकरांचा संताप उफाळला
Mumbai-Goa Highway Toll Controversy: Kharpada Plaza Sparks Public Outrage

Mumbai-Goa Highway Toll Controversy: Kharpada Plaza Sparks Public Outrage

esakal

Updated on

-अमित गवळे

पाली: तब्बल 16 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-66) काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथील टोल नाका अचानकपणे सुरू करण्यात आल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्गाची दुरवस्था कायम असताना प्रशासनाने अचानक टोल वसुली सुरू करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे. या मनमानी कारभाराविरोधात संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तीव्र संताप आणि प्रचंड उद्रेक पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com