रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हलका पाऊस सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे वातावरणही थंड आहे. किनारी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला आहे. हवामान विभागानेही १६ सप्टेंबरपर्यंत कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मच्छीमारांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सरासरी १९.०८ मिमी पाऊस झाला.
त्यात मंडणगड-१९.५०, दापोली- ५.९०, खेड- २८.७०, गुहागर- १८, चिपळूण- २२.४०, संगमेश्वर-१८.३०, रत्नागिरी- २५.५०, लांजा- २५.१०, राजापूर- ८.३० मिमी नोंद झाली. शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरु झाला. शनिवारी सकाळी संततधार सुरू होती. दुपारनंतर जोर ओसरला. रविवारी सकाळपासून दमदार सरी कोसळत आहेत. पाऊस थांबला तरीही वातावरण ढगाळच होते. समुद्र खवळला असला तरीही रत्नागिरी तालुक्यातील काही मच्छीमारी नौका रविवारी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या.
हर्णै येथील काही नौका सुरक्षिततेसाठी जयगड बंदरात दाखल झाल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित बंदरे म्हणून मिरकरवाडा आणि जयगडची ओळख आहे. त्यामुळे अनेक नौका वादळाची परिस्थिती असेल तर या ठिकाणी दाखल होतात. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टर वर हळव्या बियाण्यांची लागवड ते. ही बियाणे १०५ ते ११० दिवसात कापणी योग्य होतात. त्याप्रमाणे हळवा भात येत्या दहा दिवसात कापणीसाठी तयार होणार आहेत. पावसामुळे पीक आडवे होण्याची शक्यता आहे.
संपादन - स्नेहल कदम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.