Maharashtra company closure controversy
esakal
रत्नागिरी : राज्यात उद्योग क्षेत्राचे स्थलांतर आणि कंपन्या बंद पडण्यावरून विरोधकांकडून सुरू असलेला प्रचार हा निव्वळ फेक नॅरेटिव्ह आणि राजकीय स्टंट आहे. केवळ कागदावरच्या निष्क्रिय कंपन्यांवर नियमानुसार कारवाई झाली आहे. महाराष्ट्रातून कोणतीही कंपनी बाहेर गेलेली नाही. २०१५-१६ मधील ६ लाख ७८ हजार नोंदणीकृत कंपन्यांचा आकडा होता. तोच मोदी सरकारच्या काळात वाढून तब्बल २१ लाख १७ हजारांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत अहवालानुसार परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात अव्वल स्थानावरच आहे, असा ठाम दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.