आनंदावर पडलय विरजन.. यांना हवी आहे शासनाची मदत....

Mango farmers need government help in ratnagiri kokan marathi news
Mango farmers need government help in ratnagiri kokan marathi news
Updated on

रत्नागिरी : कोकणातील हापूस उत्पादकांपुढील संकटांची मालिका संपता संपेना अशीच झाली आहे. वाशी बाजार समितीच्या माध्यमातून हापूस विक्रीसह निर्यातीचे दरवाजे उघडण्यात यश आले होते. कोकणातून सुमारे तीनशे मेट्रीक टन आंबा निर्यातही झाला; मात्र वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मुंबई, पुणे बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याने आंबा बागायतदारांना मोठा फटका बसणार आहे. विक्रीची बसत चाललेली घडी विस्कटणार असून बागायतदारांना आता थेट ग्राहकांपर्यंत आंबा पोचवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

ऐन हापूसच्या हंगामात कोरोनाने देशातच नव्हे तर संपूर्ण जगात धुमाकुळ घातला आहे. त्याचा परिणाम हापूसच्या विक्रीवर झाला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार चांगलाच होरपळलेला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी पणन मंडळाने पावले उचलत वाशी बाजार समितीत वॉर रुम स्थापन केली. तसेच लॉकडाऊन असतानाही आंबा नाशिवंत असल्यामुळे वाहतुक आणि विक्रीसाठी शासनाने परवानगी दिली होती. परिणाम गेल्या आठ दिवसांमध्ये सरासरी आठ ते दहा हजार पेटी आंबा कोकणातून वाशीसह पुण्यात जात होता; परंतु मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मोठ्या बाजार समिती परिसरात होणारी गर्दी कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे कोकणातून बाजार समितीत जाणार्‍या हजारो आंब्याच्या पेट्या बागायतदारांच्या घरातच पडून राहणार आहे.

आधीच आंब्याला कवडीमोलाचा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात हे नवीन संकट आवासून उभे राहील्यामुळे बागायतदारांची ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होणार आहे. बाजार समितीमधील व्यवहार पुन्हा केव्हा सुरु होणार याबाबत अद्यापही शासनाकडून सुचना आलेल्या नसल्याने पुढील काळ कोकणातील बागायतदारांसाठी सत्वपरिक्षाच ठरणार आहे.


बागायतदारांना हापूस विक्रीसाठी स्वतःची यंत्रणा तयार करावी लागणार आहे. तसेच दर्जेदार आंबा वेगळा करुन तो थेट निर्यातदारांच्या पॅकहाऊस पर्यंत पोचवला तर थेट बागायतदारांची साखळी तयार होईल, असे पणनकडून सांगण्यात येत आहे. सध्या पेटीचा दर वाशीत आठशे ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. वितरण यंत्रणाच नसल्याने अडचण निर्माण होणार आहे.

आंबा उत्पादकांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शासनाने आंबा विकत घेऊन तो विविध शासकीय यंत्रणांमार्फत विक्रीसाठीची व्यवस्था करावी. तसेच ज्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव नाही, तिथे आंबा विक्री करावा आणि मोठ्या गृहनिर्माण सोसायटींमध्ये वितरणासाठी प्रयत्न करावेत.

- डॉ. विवेक भिडे,  अध्यक्ष, आंबा उत्पादक सहकारी संस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com