शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर यामुळे हसू उमटले....

Mango weather changing  trend re-enticed in Rajapur
Mango weather changing trend re-enticed in Rajapur

राजापूर (रत्नागिरी) : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि त्यानंतर हवामानामध्ये सातत्याने प्रतिकूल झालेले बदल यामुळे अनेक आंबा बागांमध्ये फळधारणा झालेली नाही. त्यामुळे आंबा बागायतदार आणि शेतकरी चिंताग्रस्त असताना पुन्हा नव्याने आंब्याला मोहोर आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे.

सध्या मोहोरलेल्या झाडांना हंगामाच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे मे महिन्यामध्ये आंबा तयार होणार आहे. त्या आंबा पेटीद्वारे मार्केटमध्ये पाठवून समाधानकारक भाव मिळणे मुश्‍किल असले तरी कॅनिंगसाठी पाठविणे शक्‍य आहे. यावर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातून काजूच्या झाडांना कमी प्रमाणात पालवी फुटली.

 यंदा  मे महिन्यामध्ये तयार होणार आंबा

शेंडेमर रोगाने भर घातली. उताराच्या भागातील झाडांवर शेंडेमर रोगाचे प्रमाण तुलनेने जास्त राहिले. अशा स्थितीतून तरलेल्या काजूला ऑक्‍टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा एकदा फटका बसला. त्यातून नोव्हेंबर महिन्यामध्ये कलमांना जी पालवी येणे अपेक्षित होती, ती आलेली नाही. परिणामी आंबा-काजूच्या झाडांना अपेक्षित असलेला मोहोर आलेला नाही. थंडीचे कमी प्रमाण, ढगाळ वातावरण अशा स्थितीतही काही झाडांना मोहोर आला. मात्र, प्रतिकूल परिणाम होऊन तो काळा पडून गळून गेला आहे. 

अपेक्षित भाव...
अनेक बागांमधील आंब्याची झाडे मोहोराविना रिकामी होती. गेल्या काही दिवसांमध्ये आंबा कलमांना पुन्हा मोहोर येऊ लागला आहे. हवामानामध्ये बदल न झाल्याने हा मोहोर टिकून राहून त्यातून फळधारणा होईल. मात्र, हा आंबा तयार होऊन त्याला अपेक्षित भाव मिळणे कठीण आहे. हा आंबा कॅनिंगद्वारे विक्री करता 
येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com