रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पोषक हवामान

Agriculture
Agriculture

पाली : जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पीक घेतले जाते. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी राजा आपल्या शेतात कडधान्य लावतो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. सध्या जिल्ह्यात कडधान्यासाठी पोषक हवामान असल्याची माहिती जिल्हा कृषी कार्यालयातून दिली गेली आहे.

कडधान्यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदीं कडधान्याची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर लावलेली तुरीची रोपे देखील चांगली फोफावली आहेत. या सर्व पौष्टिक गावठी कडधान्याला सगळीकडेच खुप मागणी असते. ते विकून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे मिळतात. थंडीचे वातावरण या पिकांसाठी अतिशय पोषक असते. सध्या जिल्ह्यात अशा प्रकारचे पोषक वातावरण आहे. पिकांवर रोग पडल्याची किंवा हानी झाल्याची कुठलीच तक्रार आलेली नसल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी सकाळला दिली. तसेच काही ठिकाणी पुरेसे पाणी न मिळाल्यास रोपे पिवळी पडू शकतात असेही त्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. परंतु धुक्यामुळे मात्र पिकावर परिणाम होऊ शकतो अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. 

भात शेती केल्यानंतर दरवर्षी कडधान्याची लागवड करतो. सध्याचे वातावरण पोषक आहे. पिके देखील चांगली जोमात आली आहेत. निसर्गाने शेवट पर्यन्त अशीच चांगली साथ दिली तर हाती चांगले उत्पादन येईल. आम्ही सेंद्रीय व पारंपारिक पद्धतीने कडधान्य पिकवितो. त्यामुळे या सकस गावठी कडधान्याला अधिक मागणी असते.
- महादेव दामाजी भोईर, शेतकरी, राबगाव - सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com