
मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर पनवेल तालुक्यातील कर्नाळा घाटात येथे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.