

Mumbai-Goa Highway Misses Third Completion Deadline
Esakal
चिपळूण, ता. ३१ : मुंबई-गोवा महामार्ग ३१ मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिल महिन्यात सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात दिले होते. मंत्र्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांनी ३१ मे पूर्वी काम पूर्ण करण्यासाठी हवा निर्माण केली. मात्र, ३१ मे उजाडला तरी महामार्गाचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सवातील प्रवास खडतरच होणार आहे.