Narendra Maharaj Appeals Hindus Should Have Two Children to Preserve Majority
eSAKAL
कोकण
हिंदूंनो किमान २ मुलं जन्माला घाला, नाहीतर बहुसंख्य हिंदू संपेल : नरेंद्र महाराज
Narendra Maharaj on Hindu : नाणीजचे रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी हिंदूंना किमान २ अपत्ये जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. हिंदू धर्म टिकवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नाणीजमधील दक्षिण पीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराजांनी हिंदूंची लोकसंख्या कमी राहिल्यास भारतातील बहुसंख्य हिंदू संपुष्टात येतील असं विधान केलंय. जगात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लीम राष्ट्र आहेत. तसं हिंदू राष्ट्र असायला नको का असंही ते म्हणालेत. हिंदू राष्ट्रासाठी देशातील हिंदूंनी जास्ती जास्त अपत्यांना जन्म दिला पाहिजे असं रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी म्हटलं. सोमवारी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

