Mumbai Goa Highway infrastructure update
esakal
पाली (रत्नागिरी) : मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर या दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या संगमावर वसलेल्या पाली बाजारपेठेतील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले (Mumbai Goa Highway Pali Flyover opening date) आहे. या पुलाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे पाली परिसरातील नागरिकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तीव्र वाहतूककोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.