

Raigad Viral Video
Esakal
रस्त्यांची दुरवस्था, खड्डे आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास ही नित्याचीच बाब बनलीय. अनेकदा राजकीय नेते आणि प्रशासनाच्या चर्चेपुरताच हा मुद्दा मर्यादित राहतो. मात्र रायगडमधील कोंदिवडे गावातील शाळकरी मुलींनी हाच प्रश्न उपरोधिक पद्धतीने मांडला आहे. शाळेला जात असताना खड्ड्यांमुळे होत असलेल्या अडचणींवर मुलींनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेत.