

Raj Thackeray
sakal
माणगाव (जि. रायगड) : ‘‘आपल्याकडे विकासकामांपेक्षा टक्केवारीचा विचार अधिक केला जातो. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे,’’ असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला. रायगड दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांच्या हस्ते माणगाव येथे मनसेच्या दक्षिण रायगड जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.