Anuskura Ghat: आपत्कालात अणुस्कुरा घाटाचाच आधार; आंबा घाटाला सोयिस्कर पर्यायी मार्ग; तीन तालुक्यांना ठरतोय लाभदायक

संगमेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या आंबा घाटमार्गानंतर राजापूर तालुक्यातून जात असलेल्या अणुस्कुरा घाटमार्गामुळे रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्रातील घाऊक बाजारपेठ खुली झाली आहे. या बाजारपेठेतून दरदिवशी विविध मालाची दरदिवशी जिल्ह्यामध्ये येथील व्यापाऱ्यांकडून आवक केली जात आहे.
Anuskura Ghat road in Rajapur taluka – the crucial alternative route for trade and transport between Ratnagiri and Kolhapur after Amba Ghat closure.
Anuskura Ghat road in Rajapur taluka – the crucial alternative route for trade and transport between Ratnagiri and Kolhapur after Amba Ghat closure.Sakal
Updated on

-राजेंद्र बाईत

राजापूर : अतिवृष्टीमध्ये २०२१ साली दरडी कोसळून आंबा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. त्या वेळी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येण्यासाठी राजापूर तालुक्यातून जाणारा अणुस्कुरा घाटमार्ग हा एकमेव पर्यायी मार्ग होता. त्या काळात खऱ्या अथनि पश्चिम महाराष्ट्राला जोडण्याच्यादृष्टीने अणुस्कुरा घाटाचे महत्त्व अधोरेखित झाले होते. आंबा घाटमार्ग बंद असल्याने कोल्हापूर भागातील बाजारपेठेतून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होणारी सर्व मालाची आवक आणि प्रवासी वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गातून सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

Amba Ghat road collapse due to heavy rain
Afroz Jhari caste certificate invalid
Ratnagiri to Mumbai seaplane service latest news
Tamhini Ghat closed due to heavy rain
Marathi News Esakal
www.esakal.com