बारसूला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला.
खेड : बारसू (Barsu) काय चौपाटी आहे का? पिकनिकला जाताय. बारसूचा प्रस्ताव तुम्हीच पाठवला आणि आता लोकांना भडकवायला पण तुम्हीच जाताय का? असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे. प्रसारमाध्यमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले.
महाविकास आघाडीच्या सभेत बारसू रिफायनरी (Barsu Refinery) दौऱ्याची घोषणा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली होती. त्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी (ता. ३) तोफ डागली. ते म्हणाले, 'बारसूला रिफायनरी व्हावी यासाठी उद्धव ठाकरे यांनीच केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि आता बारसूला जाऊन लोकांना भडकवायचे कामदेखील उद्धव ठाकरे करणार आहेत.'
बारसूला गेलात तर लोकं नावे ठेवतील. शरद पवार यांच्याकडून काहीतरी शिका. ठाकरे यांचा हा दुतोंडीपणा सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे केवळ दोनवेळाच विधानसभेत गेले ही माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांवर सांगितली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा म्हणजे फक्त गद्दार गद्दार म्हणण्यासाठी ओरड असून या थयथयाटाला जनता भीक घालणार नाही, असेही कदम यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.