Uday Samant Ratnagiri investment announcement
esakal
रत्नागिरी : जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आज मोठे पाऊल टाकण्यात आले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उद्योजक यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. जिल्ह्यात ७ हजार ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ‘ग्रीन स्टील’ प्रकल्प, संरक्षण, शिपबिल्डिंग प्रकल्प, पर्यटन आणि ऊर्जा क्षेत्रात सी-प्लेन आणि सीएनजी गॅसचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार (Green Steel Project in Ratnagiri) आहे. प्रदूषणविरहित हे प्रकल्प आहेत, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.