Bhatye coconut research centre Maharashtra
esakal
रत्नागिरी : भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने संशोधन, रोपेनिर्मिती आणि नारळविक्रीच्या माध्यमातून गतवर्षी १ कोटी २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आर्थिक यशाचा टप्पा गाठला (Bhatye coconut research centre Maharashtra) आहे. नारळ लागवडीसह अंतर्गत मसालापिकांवरील संशोधन आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात हे केंद्र अग्रगण्य मानले जाते; मात्र, गेल्या काही काळापासून संशोधक आणि कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत असल्याने या केंद्राच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.