रत्नागिरी : काँग्रेसने आगामी पालिका निवडणुकीसाठी (Upcoming municipal elections) जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष अविनाश लाड (Avinash Lad) यांच्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उमेदीने आगामी पालिका निवडणुकीमध्ये नव्या उतरले आहेत. पक्षांतर्गत समन्वय राहावा, यासाठी समन्वय समिती तर उमेदवार निवडीसाठी निवड समितीची स्थापना काँग्रेसने केली आहे.
जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या समितींची स्थापना झाली आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या आगामी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची ही तयारी आहे. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समितींमध्ये समावेश करून समन्वय व निवड समितीची जबाबदारी देण्यात आली आहे.
समितीमध्ये ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी आगाशे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत, निसार दर्वे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ प्रदीप साळवी, जिल्हा चिटणीस शब्बीर भाटकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
समितीवर राहणार ही जबाबदारी...
नगरसेवक निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणे
मुलाखती घेणे, जिल्हाध्यक्ष, उमेदवारांमध्ये समन्वय
इतर महत्त्वाची जबाबदारीही समितीला देण्यात आली
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.