

Hotel Close Ratnagiri
esakal
Ratnagiri Hotel Association Protest : रत्नागिरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या संकटामुळे २० टक्क्यांहून अधिक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ मालकांवर आली आहे. ही परिस्थिती सोमवारपर्यंत न सुधारल्यास उर्वरित हॉटेल्सही बंद करण्याच्या मार्गावर आहेत. गॅसअभावी गरीब जनतेची भूक भागविणाऱ्या ‘शिवभोजन’ केंद्रांनाही मोठा फटका बसला आहे. भोजनथाळीतून चपाती गायब झाली असून, भातावरच ग्राहकांची बोळवण करावी लागत आहे.