Ratnagiri leopard rescue by forest department
esakal
रत्नागिरी : वाढते शहरीकरण, जंगलांची बेसुमार तोड आणि नष्ट होणारा नैसर्गिक अधिवास यामुळे रत्नागिरी परिक्षेत्रात ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ तीव्र झाला आहे. गेल्या ११ वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे तब्बल ९० बिबट्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला (Leopard deaths in Ratnagiri forest area) आहे. दुसरीकडे वन विभागाने कौतुकास्पद कामगिरी करत ७५ बिबट्यांची सुखरूप सुटका करून त्यांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.