

maternal care challenges
sakal
रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ३३ मातांना प्रसूतीदरम्यान किंवा प्रसूतीनंतर आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शासन आणि आरोग्य विभागामार्फत सुरक्षित मातृत्वासाठी ‘जननी सुरक्षा’सारख्या अनेक योजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे.