Will sea water enter Mirya village this monsoon?
esakal
रत्नागिरी : रखडलेले मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सुरू करण्यात आले. जयहिंद चौकासमोर बसरा स्टार जहाज अडकल्यामुळे ३०० मीटरचे काम रखडलेले (Mirya coastal erosion barrier work Ratnagiri) होते. जहाज काढल्यानंतरही काम सुरू नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी पावसापूर्वी बंधाऱ्याचे काम न केल्यास त्या भागातून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली होती.