Mumbai Goa Highway Delay in Ratnagiri
esakal
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Highway) गेल्या १४ वर्षांपासून रखडलेल्या कामावरून कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, सरकारने हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. महामार्गाच्या दोन महत्त्वाच्या टप्प्यांचे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे दोन मोठ्या कंपन्यांना १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.