Why has rain stopped in Ratnagiri?
esakal
रत्नागिरी/मंडणगड : जूनच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या हलक्या पावसाच्या जोरावर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात पेरण्यांना सुरुवात केली होती, मात्र, ‘अल निनो’ सक्रिय झाल्यामुळे पावसाचा प्रवास रोखला गेला असून, सध्या जिल्ह्यात कडकडीत ऊन पडत (Ratnagiri Rain Delay) आहे. तुरळक पावसावर विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या पिकांच्या उगवणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.