Ratnagiri News: रत्नागिरी ग्रामीण भागात अग्निशमन यंत्रणेचा अभाव; वणवे नियंत्रणात संकट

Agricultural Loss Due to Uncontrolled Wildfires: रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वणवे नियंत्रणासाठी आपत्कालीन अग्निशमन यंत्रणा नाही.
Ratnagiri News: रत्नागिरी ग्रामीण भागात अग्निशमन यंत्रणेचा अभाव; वणवे नियंत्रणात संकट
Updated on

"दिवाळीनंतर सर्रास गावातील सड्यांवर लागणार्‍या वणव्यात शेतकर्‍यांच्या हजारो एकर बागा भस्मसात होतात. शहरी भागात आग लागल्यास नगरपालिका किंवा जवळच्या खासगी कंपनीकडील अग्निशमन बंब तत्काळ उपलब्ध होतो; मात्र, गावपातळीवर ग्रामपंचायतीचा स्वतःचा अग्नीशमन बंब नसल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या अग्निशमन बंबावर अवलबूंन राहावे लागते. सध्या अग्निशमन यंत्रणेची स्थिती ‘आग रामेश्‍वरी आणि बंब सोमेश्‍वरी’ अशीच आहे. जिल्ह्यात ९ नगरपालिकांपैकी ५ ठिकाणी अग्निशमन यंत्रणा उपलब्ध आहे; परंतु ४ ठिकाणी अद्यापही अशी यंत्रणाच नाही. त्यामुळे अनेकवेळा घटनास्थळी वेळेत अग्निशमन बंब पोहचत नाही आणि लाखो रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी होते. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागांसाठी आपत्कालीन अग्नीशमन यंत्रणा उभारण्याची गरज आहे...!"

- राजेंद्र बाईत, राजापूर

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com