ratnagiri rain
sakal
रत्नागिरी - जिल्ह्यात संततधार कायम होती. त्यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. पावसामुळे महामार्गावर वेरळ (ता. लांजा) येथे दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झालेला होता. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. २ ते ५ जुलै याल कालावधीत जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.