'कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हणं आहे. आम्हालाही कसलीच भीती नाही.'
कणकवली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपलीय. एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी थेट राणे कुटुंबावर (Rane Family) निशाणा साधलाय.
शिवरायांनाही स्वराज्य निर्मितीसाठी संघर्ष करावा लागला होता. राज्यपालांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान केला आहे. तर, राज्य तोडण्याचं काम भाजपानं केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्ता जाणार हे अगोदरच माहिती होतं. मात्र, आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत. राणे कुटुंबीयांना सत्तेचा माज आला आहे, अशी टीका नाईक यांनी राणे कुटुंबावर केलीय. ते कणकवलीतील श्रीधर नाईक चौक इथं शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेअंतर्गर जाहीर सभेत बोलत होते. यावेळी उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे, संजना घाडी, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते.
वैभव नाईक म्हणाले, भाजपकडून (BJP) अनेकांना भीती दाखवली जात आहे. त्यांची विविध प्रकारची चौकशी लावली जात आहे. पण, त्यांच्या दहशतीला शिवसेना भीक घालणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू. सध्याचा काळ संघर्षाचा आहे. कसोटीचा आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायत निडवणुका आहेत. त्यांच्या निकालातून दिसेल की जनता व आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. कोकणात भाजलेल्या कोंबडीला आगीची भीती नाही, अशी म्हणं आहे. आम्हाला कसलीही भीती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.