Tadoba Forest : चंद्रपुरातील वाघांचे 'सह्याद्री'त होणार स्थलांतर; सात ते आठ वाघांचंच अस्तित्व, सुरक्षित जंगलाची निवड

२००८ पासून भारतात व्याघ्र स्थलांतर प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
Tadoba-Andhari Chandrapur Project
Tadoba-Andhari Chandrapur Projectesakal
Summary

सह्याद्री-कोकण कॉरिडॉर किंवा सह्याद्री-राधानगरी-गोवा-कर्नाटक कॉरिडॉर उत्तर-पश्चिम घाटातील वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्वपूर्ण आहे.

चिपळूण : वनविभाग लवकरच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (Tadoba-Andhari Tiger Reserve) वाघांचे स्थलांतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामधील (Sahyadri Tiger Reserve) वाघांच्या लोकसंख्येचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

२००८ पासून भारतात व्याघ्र स्थलांतर प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरिस्का व्याघ्र प्रकल्प २००८ आणि पन्ना व्याघ्र प्रकल्प २००९ हे यशस्वी व्याघ्र पुन:प्रवेश आणि स्थलांतर प्रकल्पांचे साक्षीदार आहेत. त्यानंतर एसटीआरमधील सह्याद्री कोकण वन्यजीव कॉरिडॉर आणि गोवा, कर्नाटकमधील (Karnataka) जंगले पुरेशी सुरक्षित आणि मानवी उपद्रवांपासून मुक्त असल्यामुळे प्रकल्पाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे तज्ज्ञांना वाटते. त्यामुळे सरकार एसटीआरमध्ये वाघांचे स्थलांतर करण्याचा विचार करत आहे.

Tadoba-Andhari Chandrapur Project
Panchganga River : पंचगंगा नदीत हजारो मृत माशांचा खच; घाटाला गटारगंगेचे स्वरूप, प्रशासनाचे नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष

उत्तर-पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना जानेवारी २०१० मध्ये झाली आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत त्याची हद्द पसरली. त्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. शिकारी आणि बदलत्या अधिवासामुळे या प्रदेशात वाघांची संख्या कमी झाली आहे. एसटीआर राखीव अभयारण्य केल्यानंतरही वाघांची संख्या वाढली नाही. कारण, प्रजनन करणाऱ्या वाघांनी राखीव भागात वसाहत केली नाही.

एसटीआरच्या हद्दीत वाघांच्या उपस्थितीचे फोटो कमी आहेत आणि पदमार्गांच्या पुराव्याने सात ते आठ वाघांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाली आहे. वाघांची लोकसंख्या वाढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एसटीआरच्या दक्षिणेकडे असलेल्या जंगलांमधून गोवा आणि कर्नाटकातील वाघांना इथे आणणे आहे. त्यामुळे वन्यजीव कॉरिडॉर मजबूत होऊ शकतो; परंतु वाघांच्या संख्येत वाढ होण्यास अनेक वर्षे लागू शकतात. परिणामी, अल्पकालीन परिणामांसाठी वाघांचे स्थलांतर निवडण्यात आले आहे.

Tadoba-Andhari Chandrapur Project
Radhanagari Dam : राधानगरी, काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; भोगावती, पंचगंगा तुडुंब

सह्याद्री-कोकण कॉरिडॉर किंवा सह्याद्री-राधानगरी-गोवा-कर्नाटक कॉरिडॉर उत्तर-पश्चिम घाटातील वाघांच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी महत्वपूर्ण आहे. हा कॉरिडॉर कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राला गोव्याच्या मध्यभागी असलेल्या जंगलांना जोडतो ज्यामुळे राधानगरी वन्यजीव अभयारण्य, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संवर्धन राखीव जागा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प या प्रदेशात वाघ जोडले जातात.

मानवी वर्चस्व असलेल्या वसाहती आणि विकासाच्या हालचालींमुळे या कॉरिडॉरचे अनेक ठिकाणी तुकडे होतात ज्यामुळे वाघांच्या हालचालींना धोका निर्माण होतो आणि मानव-प्राणी संघर्षाची शक्यता वाढते. वाघांचे सह्याद्रीत स्थलांतर करण्याचे नियोजन अधिकारी करत असताना हा कॉरिडॉर मजबूत करणे अत्यंत महत्वाचे आहे.

Tadoba-Andhari Chandrapur Project
Ambolgad Tourism : 'या' सागरीमार्गामुळे आंबोळगडातील पर्यटनाला मिळणार चालना; व्यावसायिकांना होणार फायदा

कॉरिडॉर हे मूलत: निवासस्थान आणि मार्ग यामधील दुवा असतात जे वन्यजीव लोकसंख्येला जोडतात आणि वाढवतात, जे मानवी वसाहती आणि पायाभूत सुविधांच्या कामांमुळे विखुरलेले आहेत. वाघ आपल्या क्षेत्रात इतर कोणाला येऊ देत नाहीत, तसेच अनेकदा ते जोडीदार आणि अन्नाच्या शोधात लांबचा प्रवास करतात. असे करत असताना ते वन्यजीव कॉरिडॉरचा वापर करतात आणि अनेक मानवी भागातून प्रवास करतात. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचे स्थलांतर करताना त्यांच्या अन्नाची व्यवस्था होणे गरजेचे आहे.

-विकास जगताप, वन्यप्रेमी, कोयना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com