एकनाथ शिंदे लोकाभिमुख मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे लोकाभिमुख मुख्यमंत्री

79710
कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना ब्रिगेडीयर सुधीर सावंत. शेजारी वर्षा कुडाळकर, बंटी तुळसकर आदी.


एकनाथ शिंदे लोकाभिमुख मुख्यमंत्री

सुधीर सावंत ः आंगणेवाडी यात्रोत्सवात स्वागताचे नियोजन

कुडाळ, ता. ३१ ः राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोनच लोकाभिमुख मुख्यमंत्री मी पाहिले आहेत. बाकीचे सर्व मुख्यमंत्री जनतेपासून दूर गेल्यामळे जनतेची व राज्याची हानी झाली, असे मत बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आंगणेवाडी यात्रेला शनिवारी (ता. ४) मुख्यमंत्री शिंदे येणार असून त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील बाळासाहेब शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात सावंत यांनी काल (ता. ३१) पत्रकार परिषद घेतली. यावेळी येथील बाळासाहेबांची शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयात या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, कुडाळ-मालवण मतदार संघाच्या महिला संघटक नीलम शिंदे, अनघा रामाने आदी उपस्थित होते.
यावेळी सावंत म्हणाले, ‘‘यापूर्वी पहिल्यांदा मी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आंगणेवाडी यात्रेला आणले होते. त्यावेळी त्यांनी या ठिकाणी नळपाणी योजनेकरिता विशेष निधी उपलब्ध केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रांना नळपाणी योजनेकरिता विशेष निधी देण्यास सुरुवात झाली. आंगणेवाडी यात्रेस मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे येत आहेत. मुख्यमंत्री दौऱ्यानिमित्त कार्यक्रम, बैठकांचे सर्व नियोजन आम्ही केले आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या नियोजनाची मंजुरी घेणार आहे. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी आंगणेवाडी यात्रेसह इतर विकासकामांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी आम्ही करणार आहोत. इतर प्रश्नांसंदर्भातही बैठक आयोजित करणार आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे लोकाभिमुख मुख्यमंत्री होते. त्यानंतर शिंदे हे लोकाभिमुख मुख्यमंत्री असल्याचे माझे मत आहे. कारण शिंदे पहाटे चार वाजल्यापासून जनतेची कामे करतात. थेट जनतेशी संपर्क ठेवतात. बाकीचे सर्व मुख्यमंत्री जनतेपासून दूर गेले.’’
...............
चौकट
‘समृद्ध, आनंदी गाव’ संकल्पनेतून विकास
गाव हे विकासाचे केंद्र झाले पाहिजे. यासाठी माझ्या संकल्पनेतून ‘समृद्ध व आनंदी गाव’ ही संकल्पना साकारत आहे. यामध्ये आरोग्य, उद्योग, संस्कृती, पाणी, शिक्षण, पर्यावरण, स्वच्छता, वीज, समूह शेती, नैसर्गिक शेती, कृषी आधारीत उद्योग, पशुसंवर्धन, कृषी पर्यटन, क्रीडा, योगा आदी ग्रामविकासाचे ठळक मुद्दे आहेत. यामध्ये ग्रामविकास संघ सदस्य म्हणून सरपंच, पोलिस पाटील, शेतकरी-महिला बचतगट, प्रत्येक वाडीतील व मुंबईमधील प्रतिनिधी, सांस्कृतिक व क्रीडा मंडळ प्रमुख, ग्रामसेवक, तलाठी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, शाळांचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशासेविका, बँक, विद्युत मंडळ व दूरसंचार विभागाचे प्रतिनिधी आदी सदस्य असणार आहेत. गावाचा विकास झाला तर पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com