चिपळूण-राजापुरात गुंडशाही खपवून घेणार नाही

चिपळूण-राजापुरात गुंडशाही खपवून घेणार नाही

राजापुरात गुंडशाही खपवून
घेणार नाहीः आमदार साळवी
चिपळूण, ता. ११ः आपल्या मतदारसंघातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हा एक प्रकारे केलेला हल्लाच आहे. या हल्ल्याचे कोणीच समर्थन करणार नाही. झालेल्या घटनेचा तीव्र निषेध असून पोलिसांकडून योग्य कार्यवाही सुरू असल्याचे मत आमदार राजन साळवी यांनी चिपळुणात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राजापूर येथील नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केल्यानंतर हा प्रकल्प बारसू येथे नेण्याचा निर्णय झाला. या प्रकल्पाचा आपल्या पक्षश्रेष्ठींचा काही अंशी विरोध असला तरी आपण त्याचे समर्थन केलेले आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व अन्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने त्याचे अनेकांनी समर्थन केले आहे. स्थानिक पातळीवर ४० टक्के लोकांचा विरोध असला तरी आजूबाजूच्या परिसरातील बहुतांशी लोक या प्रकल्पाच्या बाजूने आहेत. त्याचाच विचार करून आपण समर्थनाची भूमिका घेतली.
विरोधात गेला किंवा विरोधात लिहित असेल तर त्याला ठार मारून टाकायचे, त्याचे कुटुंब उद्धवस्त करून टाकायचे आणि दडपशाही व बेबंदशाहीने समर्थन मिळवायचे. अशी प्रवृत्ती जर येथे जन्म घेत असेल तर अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार साळवी यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com