बिळवस हागणदारीमुक्त 
करण्यासाठी जनजागृती

बिळवस हागणदारीमुक्त करण्यासाठी जनजागृती

86652
बिळवस ः गावात हागणदारीमुक्त गाव जनजागृती फेरी काढण्यात आली.

बिळवस हागणदारीमुक्त
करण्यासाठी जनजागृती

मसुरे, ता. ३ : बिळवस गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी येथील ग्रामपंचायतच्यावतीने विविध उपक्रम हाती घेतले असून ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रशासनाचा हा उपक्रम आम्ही तन-मन-धन अर्पण करून सिद्धीस नेऊ, असे प्रतिपादन बिळवस सरपंच मानसी पालव यांनी येथे केले.
बिळवस ग्रामपंचायत आणि बिळवस महिला समूह आणि बिळवस हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हागणदारीमुक्त गाव जनजागृती प्रभात फेरी सरपंच मानसी पालव यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी बिळवस पंच सदस्य रंजना पालव, सीआरपी अमृता पालव, उर्मिला पालव, सिद्धी पालव, वेदांती पालव, रश्मी पालव, प्रज्ञा फणसे, सुजश्री पालव, सायली पालव, अंजली सावंत, स्वप्नाली सावंत, संचीता पालव, दिपाली पालव, स्वाती पालव, कल्पना पालव, सविता पालव, सरिता पालव, सानिका पालव, रुपाली पालव, पार्वती पालव, चंद्रकला पाताडे, सायली नाईक, अस्मिता पालव, ममता पालव, विनया पालव, सानिका पालव,अश्विनी पालव, रजनी पालव, रेवती परब आणि महिला समूहातील सर्व महिला, ग्रामस्थ महिला यावेळी उपस्थित होत्या. ही प्रभात फेरी बिळवस सातेरी जलमंदिर ते बिळवस ग्रामपंचायत यादरम्यान काढण्यात आली. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. प्रशासनाचे सर्व उपक्रम वेळोवेळी या ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात येत असतात, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com