विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे बिगुल वाजलेच नाही

विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे बिगुल वाजलेच नाही

rat०३३१.TXT

बातमी क्र. . ३१ (पान २ साठीमेन)

विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे बिगुल वाजलेच नाही?

जिल्हा परिषद शिक्षण विभाग ; प्रशासनाची भूमिका उदासीन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः जिल्हा परिषद कर्मचाऱ्‍यांच्या क्रीडा स्पर्धांसाठी निधी खर्च करण्यात आला; मात्र दरवर्षी होणाऱ्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांच्या क्रीडा स्पर्धांकडे दुर्लक्षच झाले. शैक्षणिक वर्ष संपत आले असून, लवकरच वार्षिक परीक्षाही सुरू होतील. तरीही मुलांमधील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी होणाऱ्‍या स्पर्धांबाबत प्रशासनाची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे क्रीडास्पर्धांचे बिगुल कधी वाजणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
खेळाडू घडण्याचा पाया जिल्हा परिषद शाळांमधून सुरू होतो. हे लक्षात घेऊन दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. कुठल्याही खेळाडूच्या क्रीडाक्षेत्रातील कारकिर्दीला शालेय जीवनापासूनच सुरवात होते. सुरवातीला जिल्हा पातळीवर होणाऱ्‍या या स्पर्धांच्या माध्यमातून राज्य, राष्ट्रीय व इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडापटूंना त्यांच्यातील क्रीडा गुण दाखवता येते. अलिकडच्या काळात खेळांमधील सहभाग वाढलेला आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे डिसेंबर महिन्यात तालुकास्तरावर आणि त्यानंतर जिल्हास्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. वैयक्तिक स्पर्धांस सांघिक खेळांचा समावेश यामध्ये केला जातो. यंदा काही तालुक्यांनी केंद्र व बीटस्तरावर स्पर्धा घेतल्या; परंतु त्याचा खर्च वर्गणी काढून केल्याची माहिती पुढे येत आहे. मुळात दरवर्षी जिल्हा परिषद सेस फंडातून क्रीडा स्पर्धांसाठी निधी दिला जातो. गेली ३ वर्षे स्पर्धा न झाल्यामुळे हा निधी खर्ची पडलेला नाही.
विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबाबत दुर्लक्ष करणाऱ्‍या जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्‍यांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात घेतल्या. जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलनही पार पडले. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली; परंतु खेळाचा पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धांकडे दुर्लक्ष झाले आहे. खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. जिल्हा परिषद शाळांमधील खो-खो, कबड्डीसह मैदानी खेळातील अनेक खेळाडू राज्य, राष्ट्रीयस्तरावर चमकले आहेत. याची जिल्हा परिषद अधिकरी, आमदार तसेच मंत्री दखल घेणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
----
कोट
जिल्हास्तरावर क्रीडा स्पर्धा घेणे आवश्यक आहे. सध्या जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने पाठपुरावा करणे शक्य होत नाही. कारभार प्रशासनकडे असल्याने त्याच्याकडून हे नियोजन झाले पाहिजे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळतो.
- दीपक नागले, माजी शिक्षण सभापती
--

शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या
कोरोना काळात दोन वर्षे बंद असलेल्या स्पर्धा सुरू होणार की नाहीत याबाबात संदिग्धता होती; मात्र क्रीडा विभागाकडून यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच क्रीडा स्पर्धा घेण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे जिल्हा क्रीडा विभागामार्फत घेण्यात येणाऱ्‍या तालुका, जिल्हा, विभाग व काही खेळांच्या राज्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्‍या खेळाडूंना दहावी, बारावी परीक्षेसाठी गुण दिले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com