संक्षिप्त

संक्षिप्त

संक्षिप्त

आसूद नदीवर नवीन पुलाची उभारणी
दाभोळ : दापोली तालुक्यातील आसूद येथील धरण बस थांब्याजवळील नदीवर नवीन पुलाची उभारणी करण्यास सुरुवात झाली असून यामुळे नदीपलीकडील राहणाऱ्या ग्रामस्थांची अडचण दूर होणार आहे. या ठिकाणी रूंदीने अधिक आणि उंचीने कमी पुल होता. त्यामुळे पावसाळ्यात या नदीला पूर आल्यानंतर पाणी पुलावरून जायचे. त्यामुळे नदीच्या पलीकडे रहाणार्या वाड्यांमधील लोकांना घरांकडे जाताना अडचण निर्माण होत असे. त्याच बाजूला उंचीला असणारा पण अरूंद पुलाची बांधणी करण्यात आली होती. त्यामुळे नागरीकांना पायी चालत जाता येत होते. वाहने नेताना अडचण निर्माण होत होती. पावसाळ्यात या जुन्या पुलावरून गाडी न्यावी लागत होती; परंतु ग्रामसडक योजनेअंतर्गत या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी करण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

शिवसेना मेळाव्यासाठी ८३ एसटी बस
दाभोळ : खेड शहरातील गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित शिवसेनेच्या मेळाव्याला कार्यकर्त्यांना जाण्यासाठी दापोली बसस्थानकातून ८३ एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. या सभेला ग्रामीण भागातून कार्यकर्ते जाण्यासाठी दापोली बस स्थानकातून ८३ बसेसचे आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे तालुक्यातील इतर मार्गावरील बसेस वेळेवर सुटत नसल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता त्या-त्या मार्गावर गाड्या सोडल्याचे दापोली आगाराकडून सांगण्यात आले.

करजगाव ग्रामस्थांकडून टँकरची मागणी
दाभोळ : दापोली तालुक्यातील करजगाव येथे पाणी टंचाई सुरु झाल्याने टँकरची मागणी पंचायत समितीकडे करण्यात आली आहे. मार्च महिना सुरू झाला की, ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांना पाणी टंचाईची झळ जाणवते. गेली अनेक वर्ष ही परिस्थिती बदलली असून टँकर मागणाऱ्या गावांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. टंचाईवर मात करण्यासाठी दापोली पंचायत समितीने टँकर उपलब्ध करून दिला आहे. सध्या तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये दरवर्षी वनराई, विजय बंधारे बांधण्यात येतात त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्याने पाणी टंचाई निर्माण होत नाही. तसेच ग्रामीण भागांमध्ये साठवण टाक्या बसविण्यात आल्या आहेत या भागातील ग्रामस्थांच्या नियोनामुळे पाणी टंचाई भासत नसल्याचे चित्र आहे.

दापोलीत दोन दिवसात
६५०० महिलांनी केला एसटी प्रवास
दाभोळ : शासनाने एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या महीला प्रवाशांना प्रवास तिकीटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची अंमलबजावणीही सुरु झाली असून दोन दिवसात दापोलीत ६ हजार ५०० महिलांनी एसटी बस मधून प्रवास केल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. या अगोदर ७५ वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांना मोफत प्रवास तर ६५ ते ७५ वय असेलल्या प्रवाशांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येत होती. आता सर्व महिलांना प्रवास तिकीटात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिला प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयाचा फायदा सर्वच महिलांना जरी होणार असला तरी ग्रामीण भागातून दररोज शहराच्या ठिकाणी शेतीमाल, भाजी विक्रीसाठी येणाऱ्या महिलांना तसेच गावोगावी मासे विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांना होणार असून त्यांच्या खर्चात बचत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com