रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्तपट्टा

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्तपट्टा

जिल्ह्यातील तीन वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सध्या ३ गावातील ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ही संख्या भविष्यात वाढेल, असे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. यावर्षी पहिला टँकर हा नियमाप्रमाणे खेडमध्ये धावला आहे. खेड तालुक्यातील केळणे धनगरवाडीत टँकरने पाणी देण्यास सुरवात झाली. त्यानंतर चिपळूण तालुक्यातील अडरे धनगरवाडी, लांजा तालुक्यातील चिंचवटी धावडेवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जलजीवन मिशनमुळे जिल्ह्याचा यंदाचा पाणी टंचाई कृती आराखडा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. यंदाच्या आराखड्यानुसार पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी ५ कोटी ७३ लाख रुपयांची गरज भासणार आहे. गतवर्षी हाच आराखडा ११ कोटी रुपयांचा होता. त्यामुळे यावर्षी हा आराखडा निम्म्यावर आला आहे.

पाजपंढरी एसटीच्या वेळेत
विद्यार्थ्यांसाठी बदल
हर्णै ः दापोलीतील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य भारत कऱ्हाड यांच्या मागणीनुसार दापोली सहाय्यक आगरप्रमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी पाजपंढरी हर्णैमधून येणाऱ्या एसटीच्या वेळ बदलून दिली. या महाविद्यालयात हर्णै, पाजपंढरी येथून सुमारे ३०-३२ विद्यार्थी शिक्षण जातात. बसची वेळ त्यांच्या सोईची नसल्यामुळे महाविद्यालयामध्ये जाण्यास विद्यार्थ्यांना विलंब होतो. सध्या परीक्षेचा कालावधी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार पाजपंढरी येथून सुटणाऱ्या बसची वेळ सकाळी १० वाजता करावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी कऱ्हाड यांनी सहाय्यक आगारप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी यांची संयुक्त बैठक घेतली. आगरप्रमुखांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून बसची वेळ बदलून पाजपंढरी ते दापोली सकाळी १० वाजता केली. संयुक्त बैठकीला सहाय्यक आगरप्रमुख सौ. रेश्मा मधाळे, प्रा, डॉ. सुरेश निंबाळकर, विश्वंभर कमळकर, अधीक्षक नंदकुमार जोशी, विद्यार्थिनी हर्षाली चोगले, समृद्धी चोगले व संघवी पावसे उपस्थित होते.


खेड आगाराला २४ लाखांवर उत्पन्न
खेड : एसटीच्या खेड बस स्थानकातून शिमगोत्सवासाठी चालवण्यात आलेल्या जादा गाड्यांच्या फेऱ्यांतून आगाराला २४ लाखांहून अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती आगारप्रमुख प्रशांत करवंदे यांनी दिली. कोरोनानंतर तीन वर्षांनी शिमगोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात आले होते. शिमगोत्सवाच्या काळात ११७ जादा गाड्यांच्या २३४ फेऱ्या धावल्या होत्या. त्यातून २४ लाखाहून अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती करवंदे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com