मडुरा परिसरात गव्यांकडून 
पिकांचे नुकसान सत्र सुरूच

मडुरा परिसरात गव्यांकडून पिकांचे नुकसान सत्र सुरूच

96606
मडुरा ः परबवाडी येथे गव्यांनी मिरची पिकाचे केलेले नुकसान. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मडुरा परिसरात गव्यांकडून
पिकांचे नुकसान सत्र सुरूच
बांदा, ता. १७ ः मडुरा-परबवाडी येथे गव्यांच्या कळपाने शेतकर्‍यांच्या मिरची पिकाचे मोठे नुकसान केले. शेतकरी ज्ञानेश पांडुरंग परब, गुरुनाथ तिळू परब व प्रकाश वासुदेव मणेरकर यांच्या मिरची पिकाची गव्यांनी नासधूस केली. यात शेतकर्‍यांचे एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी मागणी होत आहे.
मडुरा परिसरात गव्यांचा वावर असून त्यांच्याकडून रब्बी पिकांचे नुकसान सत्र सुरूच आहे. वनविभागाच्या भरपाई संदर्भातील जाचक अटी व कागदपत्रांमुळे बहुतांश शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात. शिवाय या क्षेत्राचा नकाशा देणे अनिवार्य असल्याने बरेच शेतकरी भरपाई मिळविण्याचा प्रयत्नच करताना दिसून येत नाहीत. शनिवारी (ता. १५) मध्यरात्री परबवाडी भागातील शेतीत गव्यांचा कळप घुसला. यात ज्ञानेश परब, गुरुनाथ परब व प्रकाश मणेरकर यांच्या मिरची पिकांचे मोठे नुकसान केले. सध्या गावठी मिरचीला गोव्यात मोठी मागणी असून प्रतिकिलो १ हजार रुपये दर मिळत आहे; मात्र वनविभागाकडून प्रति गुंठा केवळ ३०० रुपये कमाल भरपाई दिली जाते. त्यामुळे प्रत्यक्षात झालेले नुकसान व मिळणारी भरपाई यात मोठी तफावत आहे. शासनाने या निकषात बदल करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com