जिल्ह्यातील लघु प्रकल्पात 41 टक्के साठा

जिल्ह्यातील लघु प्रकल्पात 41 टक्के साठा

लघु प्रकल्पात
४१ टक्के साठा
काटकसर केली तरच पुढील वर्षी पुरवठा
रत्नागिरी, ता. ७ : यंदा ७० ते ८० टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पाण्याच्या वापरात काटकसर करायला हवी तरच पाण्याचा पुरवठा पुढील वर्षी योग्यप्रकारे होऊ शकेल. नागरिकांनीही पाण्याचा वापर जपून करावा, असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लघु प्रकल्पात ४१ टक्के साठा उपलब्ध आहे.
नातूवाडी या मध्यम प्रकल्पात सध्या ८.५४२ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा असून ३१.३७ टक्के इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. जिल्ह्यातील गडनदी या मध्यम प्रकल्पात सध्या ६० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या प्रकल्पात ७२ टक्के इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यात एकूण ५२ लघुप्रकल्प असून त्यापैकी ४६ प्रकल्पात पाणीसंचय केले जाते. या सर्व लघु प्रकल्पांमध्ये सध्या ९४.२६ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. अर्जुना या मध्यम प्रकल्पात सध्या उपयुक्त पाणीसाठा ६० दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी ८३ टक्के इतकी आहे. नातूवाडी आणि अर्जुना या दोन्ही मध्यम प्रकल्पांमधील पाण्याची पातळी गेल्यावर्षीपेक्षा घटली असून गडनदी प्रकल्पाची पातळी गेल्यावर्षीपेक्षा अधिक आहे. हवामान खात्याने यंदा पावसाची शक्यता सरासरीपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com