नियोजनच्या निधी खर्चात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

नियोजनच्या निधी खर्चात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

२५ (पान ३ साठी)

नियोजनच्या निधी खर्चात जिल्हा दुसरा

जिल्हा प्रशासन ः ९२ टक्के शासकीय वसुली

रत्नागिरी, ता. १५ ः यंदा जिल्ह्याची शासकीय वसुली उच्चतम ९२ टक्के झाली आहे. १२० कोटींपैकी १११ कोटींची वसुली करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या वसुलीत यावर्षी विक्रमी वसुली झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी १०० टक्के खर्च करण्यात रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाला बिनशेती दस्त, गौण खनिज, स्वामित्वधन, अनधिकृत बांधकामावरील दंड, अनधिकृत गौण खनिज उत्खनन दंड, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे होणारा दंड यातून १११ कोटींची (९२ टक्के) वसुली झाली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. चक्रीवादळात नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन शाळांसाठी १ कोटीचा निधी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावर्षी जिल्हा वार्षिक योजनेचा निधी १०० टक्के खर्च करण्यात रत्नागिरी जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे तसेच सलोखा योजनेंतर्गत सर्वाधिक ४० शेतकऱ्यांनी अदलाबदल प्रक्रिया केली आहे. बिनशेती प्रकरणेही सर्वाधिक ४१ हजार ४३६ एवढी झाली आहेत.
जिल्ह्यातील गावठाणांची निश्चिती करण्यात आली असून, १५३८ पैकी ३९५ मोजणी झाली आहे. या वेळी त्यांनी पाणीटंचाईचाही आढावा घेतला. यावर्षी कृती आराखडा निम्म्यावर म्हणजे पावणेसहा कोटींवर आला असल्याचे त्यांनी सांगितले. गाव तेथे स्मशानभूमी-दफनभूमी योजनेअंतर्गत १५३८ गावांमध्ये १९३५ ची नोंद अधिकार लेखात झाली आहे. अजूनही मोजणीची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com