चव्हाणांच्या ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास

चव्हाणांच्या ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास

04291
किर्लोस : येथील विजयालक्ष्मी सभागृहात ‘नानायात्रा’ ग्रंथाचे प्रकाशन कवी अजय कांडर, डॉ. प्रकाश परब, ॲड. सदानंद चव्हाण, माधव गावकर आदींच्या उपस्थितीत झाले.


चव्हाणांच्या ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास

कवी अजय कांडर; किर्लोस येथे ‘नानायात्रा’ ग्रंथाचे प्रकाशन

कणकवली, ता. २२ : गावच्या परिवर्तनासाठी प्रचंड धडपड करणारे गोविंद तथा नाना चव्हाण यांच्या कार्याचा कोकणातील प्रत्येक गावाने आदर्श घेण्याची गरज आहे. त्‍यांच्या संपूर्ण कार्यावर आधारित ‘नानायात्रा’ ग्रंथामध्ये गाव परिवर्तनाचा इतिहास सामावलेला आहे, असे प्रतिपादन नामवंत कवी अजय कांडर यांनी किर्लोस येथे केले.
ज्येष्ठ अभ्यासक माधव गावकर यांनी असगणी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते नाना चव्हाण यांचे चरित्र ‘नानायात्रा’ ग्रंथमध्ये शब्‍दबद्ध केले आहे. या ग्रंथाचे प्रकाशन कवी कांडर यांच्या हस्ते किर्लोस येथील विजयालक्ष्मी सभागृहात झाले. मुंबई केळकर कॉलेजचे माजी विभागप्रमुख तथा भाषा अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश परब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी व्यासपीठावर नाना चव्हाण यांचे सुपुत्र माजी विशेष न्यायदंडाधिकारी ॲड. सदानंद चव्हाण, या ग्रंथाचे संपादक माधव गावकर, गणेश बाक्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यालय प्रमुख नामदेव चव्हाण, मधु पवार, छोटू सावंत, असगणी सरपंच साक्षी नामदेव चव्हाण, प्रकाशिका स्नेहल चव्हाण, रामचंद्र सावंत, दिवाकर दळवी, अक्षय परब, महादेव चव्हाण, प्रकाश चव्हाण, मंदार चव्हाण, सुचिता तुळशीदास परब, बाळकृष्ण साटम, वैभव पारकर आदी उपस्थित होते. यावेळी बाळ तावडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘जीवन गौरव’ पुरस्कार पांडुरंग धोंडू ऊर्फ मधू पवार यांना तर नाना चव्हाण यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रकाश विठ्ठल ऊर्फ छोटू‌ सावंत यांना प्रदान करण्यात आला.
---
नानांच्या आठवणींचा पिसारा मोठा
कवी कांडर म्‍हणाले, ‘‘नाना चव्हाण यांच्या या चरित्रामुळे असगणी गावचे असे चित्र आपल्याला वाचायला मिळते. पर्यायाने तळकोकणातील संपूर्ण खेडेगावाचे लोकजीवन तत्कालीन परिस्थितीत कसे होते हेही प्राथमिक स्वरूपात या चरित्रामुळे अनुभवास येते.’’ प्रा. परब म्हणाले, ‘‘साठ वर्षांपूर्वी एका खेड्यातील माणूस फारसं शिक्षण नसतानाही गावात परिवर्तनासाठी झटू शकतो हा आदर्शही लोकांसमोर या ग्रंथामुळे पोचणार आहे.’’ माधव गावकर म्हणाले, ‘‘नानांच्या आठवणींच्या भावनांचा पिसारा मोठा आहे. जशा आठवणी तशाच त्या शब्दबद्ध केल्या आहेत.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com