प्लास्टीक मुक्तीसाठी ग्रामपंचायतीत महाश्रमदान मोहिम

प्लास्टीक मुक्तीसाठी ग्रामपंचायतीत महाश्रमदान मोहिम

३३ (पान ५ साठी)

प्लास्टिक मुक्तीसाठी ग्रामपंचायतस्तरावर महाश्रमदान

५ जूनला पर्यावरणदिनी उपक्रम ः संकलित प्लास्टिकचे पुन:र्चक्रीकरण

रत्नागिरी, ता. २३ः स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ५ जूनला पर्यावरण दिनानिमित्त प्लास्टिक मुक्तीसाठी महाश्रमदान मोहिम राबविण्यात येणार आहे. या दिवशी गोळा केलेल्या प्लास्टीकचे पुन:र्चक्रीकरण केले जाणार असून त्यासाठी चिपळूण व रत्नागिरीतील दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ही मोहीम जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाकडून राबवली जाणार आहे.
श्रमदान मोहिमेसाठी यंत्रणा ग्रामपंचायतस्तरावर नियोजन करावयाचे आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी संपर्क अधिकाऱ्यांच्या साह्याने ग्रामपंचायत निहाय २२ ते २५ मे या कालावधीत गावातील कचरा साठणारी ठिकाणे निश्चित करून जिल्हा परिषदेच्या ॲपवर जीओ टॅग करावयाची आहेत. तेथे पुन:श्च कचरा जमा होणार नाही याचीही दक्षता त्यांनीच घ्यावयाची आहे. २६ ते ३१ मे पर्यंत कार्यक्रमाची माहिती ग्रामपंचायतींना द्यावयाची आहे. व्यापारी, दुकानदारांच्या बैठका घेऊन प्लास्टिक बंदचे आवाहन केले जाईल. आशा व अंगणवाडी सेविका, सामान्य नागरीक, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थी, नेहरु युवा केंद्र, NCC, NSS चे विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलिस दल, दवाखाने, शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायतीमार्फत गावागावात जागृती केली जाईल. ५ जून या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून किमान १२ किलो प्लास्टिक गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहीम राबवल्यानंतर प्लास्टिक कचऱ्याच्या गोणी ग्रामपंचायतीचे नाव व बॅग नंबर लिहून तालुकास्तरावरील संकलन केंद्रावर पाठवायच्या आहेत. ही माहिती ॲपवर नोंदवली जाईल. ६ ते १० जून या कालावधीत मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर या तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एकत्रित केलेला प्लास्टिक कचरा प्रक्रियेसाठी वाहून आणला जाईल. या तालुक्यांसाठी चिपळूण खडपोली येथील अमर इंडस्ट्रीजची निवड केला आहे. मयुर महाडिक यांच्याशी संपर्क करून त्या कंपनीत कचरा प्रक्रियेसाठी दिला जाईल. राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर या चार तालुक्यांसाठी रत्नागिरीतील झाडगाव येथील एम. एस. मलुष्टे कंपनीचे मल्हार मलुष्टे यांची नियुक्ती केली आहे. संकलन आणि कचरा कंपनीपर्यंत नेण्याचे नियोजन पंचायत समितीस्तरावरुन गटविकास अधिकारी यांनी करावयाचे आहे. प्लास्टिकच्या प्रकारानुसार ग्रामपंचायतीला कंपनीकडून किलोनिहाय रक्कम दिली जाणार आहे.
-------
कोट
गटविकास अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतनिहाय संपर्क अधिकारी नेमुन जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा संकलन करणारी गावे व संपर्क अधिकारी यांची नोंद ठेवायची आहे. यामध्ये चांगले काम करणाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे.
- कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com