भाजपचे जिल्ह्यात जनसंपर्क अभियान

भाजपचे जिल्ह्यात जनसंपर्क अभियान

06174
कणकवली ः मोदी सरकारची नऊ वर्षे जनसंपर्क अभियानाची माहिती देताना आमदार नीतेश राणे. शेजारी नीलेश राणे, अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, संध्या तेरसे आदी.

भाजपचे जिल्ह्यात जनसंपर्क अभियान

आमदार नितेश राणे; पंतप्रधान मोदींमुळे देश महासत्तेच्या दिशेने

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ३१ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे केंद्रातील नऊ वर्षांच्या कालखंडामध्ये देश महासत्तेच्या दिशेने पुढे जात आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हे घोषवाक्य घेऊन शेवटच्या घटकापर्यंत पोचण्यासाठी नववर्षाच्या यशोगाथाची ही पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. केंद्राच्या नववर्षाच्या कारकिर्दीचे जनसंपर्क अभियान ३० मे ते ३० जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. विविध टप्प्यांमध्ये त्या अभियानानुसार केंद्राने केलेल्या विकास योजना आणि वैयक्तिक लाभाच्या योजना घरोघरी पोचवल्या जाणार आहेत, असेही ते म्हणाले.
जनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी आज येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा भाजप नेते नीलेश राणे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे, भाजप संघटक मंत्री प्रभाकर सावंत, माजी सभापती मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, आनंद शिरवलकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, ‘‘केंद्राच्या २०१४ ते २०२३ हा देशाचा सुवर्णकाळ होता. मोदींच्या नेतृत्वाखाली विकासाची घौडदौड सुरू ठेवली. प्रगतीच्या दिशेने निर्णय घेतले गेले. गरीब कल्याणच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची वेगळी ओळख जगभरात निर्माण झाली. यापूर्वीचे सरकार भ्रष्टाचाराने भरबटलेले होते. त्यामुळे देशाची भ्रष्ट देशांमध्ये नोंद होती. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना स्वातंत्र्य नव्हते. त्यामुळे १४० कोटी जनतेने मोदी यांच्या हातामध्ये देशाची सत्ता दिली. या सत्तेच्या काळात प्रत्येक घटकाला मोदींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सन्मान योजना, मच्छीमारांसाठीही वेगवेगळ्या योजना, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. कोकण रेल्वेचाही विकास होत आहे. पंतप्रधान आवास योजना देशभरातील लाभार्थींना हक्काचे घर मिळाले. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचत आहे. सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य घेऊन धार्मिक स्थळांचाही विकास केला जात आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरात स्मार्ट सिटी ही संकल्पना राबवली. वंदे भारत ही जगभरात वेगळी ओळख असणारी ट्रेन देशात धावू लागली. मेट्रोचे जाळे शहरात पसरत आहे. त्यामुळे येत्या २०२४ मध्ये केंद्राची सत्ता भाजपच्या हाती राहणार असून फिर एक बार मोदी सरकार येईल.’’
-----------
चौकट
तिसरी आघाडी अस्तित्वात नाही
भाजप कामाच्या जोरावर पुढे जात आहे. त्यामुळे मोदींची स्पर्धा करणारी व्यक्ती विरोधकांकडे नाही. त्यामुळे तिसरी आघाडी अस्तित्वातच येणार नाही, असा दावाही राणे यांनी केला. आघाडीचा हा प्रयोग अनेकदा झाला; पण, तो टिकला नाही, असेही ते म्हणाले.
----------
असे असेल जनसंपर्क अभियान
* जिल्ह्यात एक जाहीर सभा
* संयुक्त मोर्चा संमेलन
* जिल्ह्यातील व्यापारी संमेलन
* योजनेच्या लाभार्थींची भेट
* २१ जून योग दिवस साजरा
* ‘संपर्क ते समर्थन’ अभियान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com