पुरेसे शिक्षक उपलब्ध न झाल्यास आंदोलन

पुरेसे शिक्षक उपलब्ध न झाल्यास आंदोलन

rat६p२७.jpg-
०७४९२
रत्नागिरी ः पुरेसे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुजार यांना निवेदन देण्यात आले.
-----------
पुरेसे शिक्षक उपलब्ध
न झाल्यास आंदोलन
विलास चाळके; जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांना इशारा
रत्नागिरी, ता. ६ ः जिल्ह्यात १० टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त असताना आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असा निकष आहे. तरी ७२७ शिक्षक कार्यमुक्त करण्यात आले आहे. यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात याचा अध्यापनावर मोठा परिणाम होणार आहे. पुरेसे शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमार्फत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देणारे निवेदन ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांना दिले.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे जिल्ह्यातील रिक्त शिक्षकपदांचा आकडा २ हजारावर पोचला आहे. याचा शिक्षणक्षेत्रावर फार मोठा परिणाम होणार आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत शिक्षकसंख्येच्या १० टक्केपेक्षा जास्त शिक्षकसंख्या रिक्त असतानाही आंतरजिल्हा बदलीप्राप्त शिक्षकांना कार्यमुक्त करू नये, असा निकष आहे. तरी ७२७ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. वास्तविक शिक्षक भरती करूनच या शिक्षकांना कार्यमुक्त करणे गरजेचे होते. याची दखल घेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, राजापूर विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विभागप्रमुख नरेश दुधवडकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com