सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेबीज आठवडा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेबीज आठवडा

34686
डॉ. सई धुरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात
रेबीज आठवडा

डॉ. सई धुरी ः चार ऑक्टोबरला होणार सांगता

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः जिल्ह्यात रेबीज आठवडा साजरा होत असून, याचा समारोप ४ ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली.
याबाबत माहिती देताना डॉ. धुरी म्हणाल्या, ‘‘प्राण्याने त्यातही प्रामुख्याने कुत्रा चावल्यामुळे होणारा आजार म्हणजे ‘रेबीज’. हा आजार जीवघेणा असून, वेळीच आणि योग्य उपचार मिळाले तरच जीव वाचविता येऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कुत्रा चावल्यानंतरच्या वैद्यकीय उपचारांबाबत सामान्यांमध्ये खूप कमी प्रमाणात जनजागृती आहे. यामुळेच जगभरात दरवर्षी ५९ हजारपेक्षा जास्त लोकांना रेबीजमुळे आपले प्राण गमवावे लागतात. रेबीजमुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूपैकी ३६ टक्के मृत्यू एकट्या भारतात नोंदवण्यात येतात. आशिया आणि अफ्रिकेत रेबीजचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. प्राण्यांनी चावल्यामुळे पसरणारा ‘रेबीज’ हा एक व्हायरस म्हणजे विषाणूजन्य आजार आहे. याचा व्हायरस रुग्णाच्या शरीरात शिरल्यानंतर मज्जासंस्थेवर हल्ला करतो. यामुळे रुग्णाच्या डोक्यात आणि मणक्यात सूज येते. रेबीज व्हायरस रुग्णाच्या डोक्यात शिरल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो किंवा मृत्यू होऊ शकतो. या आजारावर कोणताही ठोस उपाय नाही. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत.’’ त्या पुढे म्हणाल्या, ‘‘रेबीज प्रामुख्याने जंगली प्राण्यांमध्ये व काही प्रमाणात घरातील पाळीव प्राण्यांमध्येही आढळून येतो. रेबीजचा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या लाळेतुन हा आजार पसरतो. रेबीज व्हायरस प्राण्यांच्या लाळेतून माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे प्राणी चावल्यानंतर जखमेची जागा स्वच्छ करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. रेबीजवर नियंत्रण हा एकमेव पर्याय आहे.’’
--
वेळीच उपचार तर वाचतील प्राण
डॉ. धुरी म्हणाल्या, ‘‘रेबीज आजाराबाबत आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती नसल्याने लोक उशिरा डॉक्टरांकडे उपचारांसाठी पोहोचतात; मात्र प्राणी चावल्यानंतर तत्काळ वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे लक्षणांवर योग्य उपचार होतात आणि रोगाचा प्रसार नियंत्रणात ठेवता येतो. रेबीज प्रतिबंधासाठी रेबीजविरोधी लसीचे पाच डोस घ्यावे लागतात. प्राणी चावल्यानंतर त्याच दिवशी लस घ्यावी लागते. याला ‘शून्य दिवस’ असे म्हटले जाते. त्यानंतर ३, ७, १४ आणि २८ व्या दिवशी रेबीजविरोधी लस घ्यावी लागते. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील प्राण्यांनी चावा घेतल्यानंतर अशाच पद्धतीने लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. प्राण्यांनाही अशाच पद्धतीने रेबीजविरोधी लसीचे डोस देण्यात येतात.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com