Ratnagiri Beekeeping
Ratnagiri Beekeepingesakal

रत्नागिरीतील देवडे, किरबेट बनणार 'मधाचे गाव'; लोकांना गावातच मिळणार रोजगार, मधूपर्यटनालाही चालना

शेती उत्पादनात मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे ३५ ते ४० टक्के वाढ होते.
Summary

शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात.

रत्नागिरी : मधमाशी संवर्धनासोबत (Beekeeping) मध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील देवडे आणि किरबेट ही दोन गावे मधाचे गाव बनवण्यात येणार आहेत. राज्यात मांघर, पाटगावनंतर रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दोन गावांची निवड करण्यात आली आहे. मधाचे गाव संकल्पनेमुळे लोकांना गावातच रोजगार मिळणार असून, कृषी पर्यटनाच्या (Agritourism) धर्तीवर मधूपर्यटनालाही चालना मिळू शकते.

शेती उत्पादनात मधमाशांमुळे होणाऱ्या परागीकरणामुळे ३५ ते ४० टक्के वाढ होते. मधमाशांची संख्या वाढावी तसेच त्यांचा सकारात्मक प्रसार व्हावा, या उद्देशाने खादी ग्रामोद्योग विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी देवडे आणि किरबेट ही दोन गावे वसलेली आहेत. निसर्गसंपन्न गावामध्ये कुऱ्हाडबंदी आहे. वृक्षतोड केली जात नसल्यामुळे या गावात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे. या गावातील शेतकरी (Farmer) सेंद्रिय पद्धतीने शेती करतात.

Ratnagiri Beekeeping
Olive Ridley Turtle : महिन्यात समुद्रात झेपावली 683 कासवांची पिल्ले; कासवमित्रांकडून 180 घरट्यांचं संरक्षण

यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ६० शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरणही केले आहे. त्यामुळे मधमाशांना आवश्यक मुबलक फुलोरा खाद्य येथे मिळू शकते. गावात २०० ते ३०० मधमाशांच्या कॉलन्या आहेत. या गावात सातेरी, आग्या मधमाशांच्या जाती आढळतात. पारंपरिक पद्धतीने मध काढून त्याची विक्री करणे हा येथील शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे; परंतु आधुनिक पद्धतीने हा व्यवसाय करता यावा यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना ४० गट गावातील शेतकऱ्यांना देण्यात आले होते. त्यामधून शेतकऱ्यांना दिडशे किलोपर्यंत मध मिळत आहे.

Ratnagiri Beekeeping
Tusker Elephant : 'टस्कर हत्ती' बेळगावच्या वेशीवर; फटाके-काडतूसांचा आवाज करून पोलिसांनी हत्तीला लावले हुसकावून

एक हजार पेट्यांमध्ये उपक्रम

या उपक्रमांतर्गत एक हजार पेट्या मधपालनासाठी देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात ५०० पेट्या देण्यात येणार असून, आतापर्यंत ५० मधपालांना ४० पेट्या दिल्या आहेत. जिथे फुलोरा जास्त आहे त्या काळात एका मधपेटीतून सामान्यतः २५ ते ३० किलो मध निघतो. शेतकऱ्याने दहा मधपेट्या बाळगल्यास वर्षाला ३०० किलो मध मिळतो. वर्षाकाठी एका शेतकऱ्याला दीड ते पावणेदोन लाख रुपये प्राप्त होतात. या व्यतिरिक्त मधाच्या पोळ्यातून निघणाऱ्या मेणापासून अन्य उत्पादनेही तयार करता येतात. देवडे आणि किरबेट ही गावे विशाळगडाच्या पायथ्याशी असल्यामुळे ऑक्सिजन पातळी चांगली आहे.

मधमाशी संवर्धनासोबत मध संकलनाचा व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून गावात अर्थार्जनाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी मधाचे गाव हा उपक्रम राबवला जात आहे. देवडेसारख्या निसर्गसंपन्न अशा गावामध्ये यासारख्या उपक्रमामधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करता येईल.

-अनिल कांबळे, देवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com