राजापुरात शनिवारपासून दोन दिवसांनी पाणीपुरवठा

राजापुरात शनिवारपासून दोन दिवसांनी पाणीपुरवठा

७७९५२

राजापुरात शनिवारपासून
दोन दिवसांआड पाणी
राजापूर, ता. १७ ः शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा खालावल्याने पाणीपुरवठ्याची पूर्णपणे भिस्त शिळ जॅकवेलवर आहे; मात्र त्या ठिकाणी वारंवार खंडित होणाऱ्‍या वीजपुरवठ्यामुळे शहरावर आगामी काळामध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट आहे. त्यामुळे पालिकेने शहरामध्ये दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शनिवारपासून (ता. २०) शहरामध्ये दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली.
वाढत्या तापमानामुळे सायबाच्या धरणातील पाणीसाठा खालावला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये पालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली होती. त्यानंतर गेल्या महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. आता दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com